गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’! ‘वामा’ चित्रपटातील आयटम साँग प्रदर्शित
सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ या गाण्याने पुन्हा एकदा मराठी रसिकांची मने जिंकली आहेत. ‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी चित्रपटातील हे गाणं केवळ एक आयटम साँग नसून, त्यामागे एक सशक्त सादरीकरण आणि मेहनत दडलेली आहे.
थंडीचा कडाका असूनही, गौतमीने आपल्या नृत्याने प्रेक्षकांना थक्क केलं. तिच्या एक्स्प्रेशन्स, अदा आणि एनर्जीमुळे हे गाणं अजूनच खुललं आहे. तिचं व्यावसायिक वर्तन आणि मेहनतीचं दर्शन या गाण्यात ठळकपणे दिसून येतं.
🎬 चित्रपटाची पार्श्वभूमी (About the Movie – ‘Vaama’):
‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट महिलांच्या सन्मान, संघर्ष आणि आत्मगौरवावर आधारित आहे. कश्मीरा कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 23 मे रोजी प्रदर्शित होतो आहे. दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांचं असून, निर्मिती ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. यांची आहे.
‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची कथा स्त्री सन्मान, आत्मगौरव आणि संघर्ष याभोवती फिरणारी आहे. त्यात नायिकेची सशक्त लढाई मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. तसेच चित्रपटात डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.
दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणातात की, महिला सशक्तीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट असला तरी हा गंभीर चित्रपट नाही. यात मनोरंजनही आहे. हे आयटम साँग ही कथेची गरज होती आणि या नृत्यासाठी गौतमी पाटीलाशिवाय कोणीही पर्याय असूच शकत नाही. या गाण्याचे उज्जैनमध्ये 4 डिग्री सेल्सिअसमध्ये चित्रीकरण झाले. गौतमीने एवढ्या थंडीत, अगदी काही तासांत नृत्याचा सराव करत इतके बहारदार नृत्य सादर केले. यातून तिचे कामाप्रती असलेले प्रेम आणि व्यावसायिकता दिसते. गौतमीची अदाकारी, वैशाली सामंत यांचा ठसकेदार आवाज, गाण्याचे बोल आणि संगीत या सगळ्यानेच हे गाणे कमाल बनले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे सध्या गाजतेय, याचा आनंद आहे.
निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात की, हे गाणे चित्रपटात एक वेगळीच रंगत आणणारे आहे. गाण्याची टीमही जबरदस्त असल्याने या गाण्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. ओंकारेश्वरा प्रस्तुत अन् सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या 23 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDelete